महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे हाऊस फुल

®अधिवेशन वृतसेवा, दिलीप शिंदे, सोयगाव दि. ३१ : संपुर्ण जग नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. कोरोनाचा भयावह अनुभव मागे टाकत पर्यटकाच्या उत्साहाला भर येत असुन खाशा पर्यटकांना पर्यटनाची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे खेचुन नेत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सर्वच पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्याबरांबरच निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत.-
नव वर्षाच्या स्वागताची तयारी करताना नाताळ सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला असुन नव वर्षाच्या जय़यत तयारी महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये उत्साहाने करण्यात येत आहे. पर्यटक निवासांमध्ये निसर्गाचे भान ठेवुन जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी विंनती करणार आहे. पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे, तथापि प्रत्यक्षात अनुभवात्मक पर्यटनाचा अनुभव पर्यटक निवासांमध्ये देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे आगामी डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत आहेत. आताच महामंडळाच्या पर्यटक निवासांचे ९५ टक्के आरक्षण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातील अजंठा (फर्दापुर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. दरम्यान सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. महामंडळाची आणि पर्यटकांचीही आतुरता आता संपली असुन सर्व पर्यटक निवासे जवळपास फुल झाली आहेत. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. डिसेंबर आणि नाताळच्या हंगामामध्ये पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. विविध छंद, पारंपारीक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. पर्यटक निवासाच्या १०० किमी च्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहीती पर्यटक निवासांमध्ये पर्यटकांना देण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रांताच्या लोकसंस्कृतीबाबत पर्यटकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता असते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन तसेच वेगवेगळया लोकरुचक लोककला यांव्दारे पर्यटकांना आनंद दिल्यास पर्यटन व्यवसाय निश्चित बहरतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे एकुण 30 निवासे व उपहारगृह यांचे परिचलन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने आजवर घेतलेल्या आणि घेत असलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रतुनच न्हवे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. ‘अतिथी देवो भव’ या नीतीचा अवलंब करत येणाऱ्या पर्यटकांना निवासामधील कर्मचाऱ्यांव्दारे उत्तम सोयीसुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सुचना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक मा. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी दिल्या आहेत. बेधुंद पावसाने चिंब भिजत वर्षा पर्यटन अनुभव घेण्यास आणि दिपोत्सवाचा अनोखा क्षण आठवणीत साठवुन ठेवण्यास चुकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नाताळ आकण नववर्षाच्या स्वागताची गुलाबी थंडी मध्ये खाशा पर्यटकांसाठी विविध उपक्रमांची शाही मेजवानीच घेवुन येणार आहे…. त्यामुळे महामंडळाची पर्यटक निवासे १०० टक्के आरक्षित होणार आहेत. गुलाबी थंडीची चाहुल, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे वेध पर्यटकांना लागले असल्याने पर्यटकांची पावले आपोआप थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गाकडे वळत आहेत.
आगामी गुलाबी थंडीचा हंगाम, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. सर्व पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात येणार आहे. पर्यटन समृध्द असलेल्या महाराष्ट्रामध्ये पर्यटन आणि पर्यावरण अशा दोन्ही घटकांचा विचार करत पर्यटनास चालना देण्याचा महामंडळाचा मनोदय आहे. पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेत असल्याने नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.
सवलती – हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत असल्याने निसर्गरम्य असलेल्या पर्यटक निवासामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक ही उत्सुक असल्याचे दिसुन येत आहे. महामंडळानेही हिवाळी पर्यटन आणि नाताळ सुटयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी २० टक्के, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी १० ते २० टक्के सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी निवडक ठिकाणी वाय-फाय सुविधा सुरु केली असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आनंद व्यक्त करीत आहेत.

  • सोयी – सुविधा :- पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.
    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरु असुन www.mtdc.co या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी नाविन्यपुर्ण अशा “वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर” या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे सर्वत्र नियोजन करण्यात आले आहे.
    महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपत, तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आध्यात्मिक वारसा तर जंगल सफारीतुन साहसी अनुभव अशा अनेक पैलूंचा आणि निवांत समुद्रकिनारे व मोहक पर्वतरांगांमधील शांतता अनुभवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना साद घालीत आहे. पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे. ★★★★★
Scroll to Top