
जाहिरात व बातमीसाठी आवश्यक संपर्क करा : 9322365100
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल नंबर-15 मधील वसीटा कॉलनी परिसरातील पाणी समस्या ही मागील अनेक वर्षांपासून गंभीर समस्या झाली होती. त्यामुळे त्या परिसरात पानी तुटवाडा जाणवत होता. अनेक घरात पानी येत नसल्याने तेथील नागरिकानी या बाबत भारतीय जनता पक्षाचे सौ.सुलभा गणपत काळू गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारास तक्रार केल्याने त्यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ नूतन पिण्याची पाण्याची नूतन लाइन टाकण्याचे पत्र/आदेश दिले व नूतन पाण्याची लाईन टाकून कामास सुरुवात केली. त्यावेळी निलेश वि. बोबडे (भाजपा कार्यकर्ते) व भाजपा सहकारी सन्नि वासीटा, दीपक गायकवाड यांच्या पाठपुराव्यास यश आले व तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला व त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ★★★★★